शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

हरवलेलं बालपण …………?

मायेचा गोडवा प्रेम व्यक्त करत जातं 
ती चिमुकली मात्र त्या गोडव्यात व्यक्त होत जाते 
या गोडव्याचे बंध स्वप्नांमध्ये रुतलेले असतात 
हे बंध जपताना भीती त्या चिमुकलीच्या जगण्याचा वेध घेत असते……. ? 
     जगण्यातल्या त्या पहिल्या टप्प्याकडे पाहताना अनुभव आणि भीती या दोनही गोष्टी आपल्या बरोबर असतात पण धैर्य गाठायला भयासोबत माउलीच्या या मायेच्या गोडव्याने आत्मविश्वास , बळ , आणि प्रेम या तीन गोष्टींच कुंपण त्या चिमुकलीच्या हृदयाभोवती घातलेलं असतं.  
माऊलीनं जन्म दिला 
अन त्या जगण्यातला गोडवा हळूहळू त्या इवल्याश्या चिमुकलीला कळू लागला 
या गोडव्यानं त्या चिमुकलीला नवनवीन अर्थ सापडू लागले 
आणि ती चिमुकली ते अर्थ दिवसागणिक शोधू लागली 
माऊलीच्या मायेच्या गोडव्यानं तिला अर्थागणीक भावार्थही उमगू लागले 
अनुभव , आठवणी , आणि प्रेमाचे बंध त्या चिमुकलीला कळू लागले. 
भ्याडपणा समोर असताना जगायचं कसं , जगणं फुलवायचं कसं याचे भाव तिला मायेच्या या गोडव्यानं स्पर्शून जाऊ लागले…………… !
     हे सांगण्याचा उद्देश असा कि धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःला वेळच देत नाही. त्या माऊलीच्या मायेच्या गोडव्याच स्मरण करणंच हरवून गेलाय जन्माला आल्यावर आपलं नातं माउलीच्या जगण्याने वेढलेलं आणि जोडलेलं असतं. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल कि मानवाच्या या धकाधकीच्या जगण्यातलं पाहिलं नातं सध्या वेळेशी जोडलं गेलंय. घड्याळाच्या काट्यावर मिनिटामिनिटाला त्याची दैनंदिनी बदलत असते. 
    पण एकंदरीतच अशा जगण्याचा विचार करत असता असे दिसून येते कि किती भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे .
आता बघा नं त्या चीमुकालीसारखे अनेक जीव जन्माला येतात , आणि अनेक जीव तुमच्या - आमच्यासमोर नाहीसे होऊन जातात सूर्योदय आणि सुर्यास्ताच गणित कधी चुकत नाहीत पण माणसाच्या जगण्यातली गणितं मात्र कळत नकळत चुकतातच. आणि तसही जन्मापासूनच हे गणित कधीच चुकलेलं नाही. मग हे आयुष्य किती दिवसाच ………. ?
     खरच लहानपणीचं ते सुंदर असे दिवस  खेळण , बागडण आणि ती निष्पाप निरागसता या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवल्या आहेत. ती चिमुकली त्या हरवलेल्या लहानपणाचा पाठलाग करत आहे . त्या आठवणींचा शोध घेत आहे. जेव्हा त्या चीमुकालीसारखे दिवस आपण सुद्धा अनुभवलेले असतात आणि जेव्हा आपल्याला मोकळीक देणारं कोणी नसत , आपल्याला कोणी जाणून घेणारं नसत , कोणासोबत व्यक्त व्हाव म्हटल तर आपल्यासाठी दुसर्या व्यक्तीला वेळ नसतो. सतत कामाचा ताण , मनाचा गोंधळ , आपलं म्हणणारं कोणी आहे का याचा शोध घेणारं ……… हि मनाची गुंतागुंत सोडवणारी कोणी असेल तर त्या माऊलीच्या मायेचा गोडवा ……………… !   
कोणावर तरी प्रेम करायचं , कोणासाठी तरी झगडायचं , कोणावर तरी विसंबून राहायचं , कोणासाठी तरी काम करायचं , कोणासाठी तरी खोटं बोलायचं , कोणासाठी तरी तितकाच मारही खायचा , कोणासाठी तरी वाईट काम सुद्धा करायचं , कोणावर तरी जबरदस्तीही करायची, कोणाचे तरी भाव जपायचे , कोणाचेतरी अश्रू पुसायचे , कोणासाठी तरी कोणाचा तरी स्वार्थीपणाने विचार करायचा हे सगळ लाइफस्टाइल हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सुरु आहे आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या लाइफस्टाइलमध्ये होत असतो. हे सांगण्याच तात्पर्य अस कि आपल्या लहानपणीच्या जगण्यात आणि आताच्या जगण्यात किती व्यापक अशी तफावत दिसून येते. 
     म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या हिताचा विचार करतो पण त्या बालपणाच्या निरागसतेचा कोणी एका क्षणासाठी सुद्धा विचार करत नाही. ह्या चिमुकलीची किलबिल सुद्धा कोणी तयार नसत. ती मात्र हरवलेल्या बालपणाचा शोध घेण्यातच गुंतून गेलेली असते. 
 त्या चिमुकलीचे ते अबोल भाव काळजाला जेव्हा स्पर्शून जातात आणि  ते हरवलेले बालपण आपणही क्षणार्धात शोधू लागतो., कुठेतरी आपण आपल्या बालपणाचा विचार करू लागतो., आपल्याला आपल्या बालपणाची हुरहूर लागते ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतात केव्हा घडतात …………. ? तर जेव्हा आपल्याला हवीहवीशी वाटणारी माणस आपल्या सानिध्यात राहतात , आपल्याला समजून घेतात,   
ण काहीही झाल तरी हरवलेलं बालपण शोधण्यात सुद्धा एक वेगळीच मज असते. आपल्या जीवनात एक प्रकारे नवलाईचं वातावरण निर्माण होतं. जरी आपण आपल हरवलेलं बालपण शोधत असलो तरीही आपल्याला नवीन आठवणींची साठवण करता येते, अनोळखी व्यक्तींसोबत एक नाव नात निर्माण होतं, बरेचशे चागले-वाईट अनुभव घेत येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी तरी स्पेशल असतो किंवा नसतोही पण आपल्याला आपल्या धेय्यापुर्तीकडे नेण्याचं काम माऊली करत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या हरवलेल्या  बालपणाची आठवण करून देत असते आणि जगण्यातली ती चिमुकली सतत त्या गोष्टींचा शोध घेण्यातच मग्न असते ते या माउलीचं काळीज जपण्यासाठी……… ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा