AMRUTA . R. SONAWANE
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४
हरवलेलं बालपण …………?
मायेचा गोडवा प्रेम व्यक्त करत जातं
ती चिमुकली मात्र त्या गोडव्यात व्यक्त होत जाते
या गोडव्याचे बंध स्वप्नांमध्ये रुतलेले असतात
हे बंध जपताना भीती त्या चिमुकलीच्या जगण्याचा वेध घेत असते……. ?
जगण्यातल्या त्या पहिल्या टप्प्याकडे पाहताना अनुभव आणि भीती या दोनही गोष्टी आपल्या बरोबर असतात पण धैर्य गाठायला भयासोबत माउलीच्या या मायेच्या गोडव्याने आत्मविश्वास , बळ , आणि प्रेम या तीन गोष्टींच कुंपण त्या चिमुकलीच्या हृदयाभोवती घातलेलं असतं.
माऊलीनं जन्म दिला
अन त्या जगण्यातला गोडवा हळूहळू त्या इवल्याश्या चिमुकलीला कळू लागला
या गोडव्यानं त्या चिमुकलीला नवनवीन अर्थ सापडू लागले
आणि ती चिमुकली ते अर्थ दिवसागणिक शोधू लागली
माऊलीच्या मायेच्या गोडव्यानं तिला अर्थागणीक भावार्थही उमगू लागले
अनुभव , आठवणी , आणि प्रेमाचे बंध त्या चिमुकलीला कळू लागले.
भ्याडपणा समोर असताना जगायचं कसं , जगणं फुलवायचं कसं याचे भाव तिला मायेच्या या गोडव्यानं स्पर्शून जाऊ लागले…………… !
हे सांगण्याचा उद्देश असा कि धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःला वेळच देत नाही. त्या माऊलीच्या मायेच्या गोडव्याच स्मरण करणंच हरवून गेलाय जन्माला आल्यावर आपलं नातं माउलीच्या जगण्याने वेढलेलं आणि जोडलेलं असतं. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल कि मानवाच्या या धकाधकीच्या जगण्यातलं पाहिलं नातं सध्या वेळेशी जोडलं गेलंय. घड्याळाच्या काट्यावर मिनिटामिनिटाला त्याची दैनंदिनी बदलत असते.
पण एकंदरीतच अशा जगण्याचा विचार करत असता असे दिसून येते कि किती भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे .
आता बघा नं त्या चीमुकालीसारखे अनेक जीव जन्माला येतात , आणि अनेक जीव तुमच्या - आमच्यासमोर नाहीसे होऊन जातात सूर्योदय आणि सुर्यास्ताच गणित कधी चुकत नाहीत पण माणसाच्या जगण्यातली गणितं मात्र कळत नकळत चुकतातच. आणि तसही जन्मापासूनच हे गणित कधीच चुकलेलं नाही. मग हे आयुष्य किती दिवसाच ………. ?
आता बघा नं त्या चीमुकालीसारखे अनेक जीव जन्माला येतात , आणि अनेक जीव तुमच्या - आमच्यासमोर नाहीसे होऊन जातात सूर्योदय आणि सुर्यास्ताच गणित कधी चुकत नाहीत पण माणसाच्या जगण्यातली गणितं मात्र कळत नकळत चुकतातच. आणि तसही जन्मापासूनच हे गणित कधीच चुकलेलं नाही. मग हे आयुष्य किती दिवसाच ………. ?
खरच लहानपणीचं ते सुंदर असे दिवस खेळण , बागडण आणि ती निष्पाप निरागसता या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवल्या आहेत. ती चिमुकली त्या हरवलेल्या लहानपणाचा पाठलाग करत आहे . त्या आठवणींचा शोध घेत आहे. जेव्हा त्या चीमुकालीसारखे दिवस आपण सुद्धा अनुभवलेले असतात आणि जेव्हा आपल्याला मोकळीक देणारं कोणी नसत , आपल्याला कोणी जाणून घेणारं नसत , कोणासोबत व्यक्त व्हाव म्हटल तर आपल्यासाठी दुसर्या व्यक्तीला वेळ नसतो. सतत कामाचा ताण , मनाचा गोंधळ , आपलं म्हणणारं कोणी आहे का याचा शोध घेणारं ……… हि मनाची गुंतागुंत सोडवणारी कोणी असेल तर त्या माऊलीच्या मायेचा गोडवा ……………… !
कोणावर तरी प्रेम करायचं , कोणासाठी तरी झगडायचं , कोणावर तरी विसंबून राहायचं , कोणासाठी तरी काम करायचं , कोणासाठी तरी खोटं बोलायचं , कोणासाठी तरी तितकाच मारही खायचा , कोणासाठी तरी वाईट काम सुद्धा करायचं , कोणावर तरी जबरदस्तीही करायची, कोणाचे तरी भाव जपायचे , कोणाचेतरी अश्रू पुसायचे , कोणासाठी तरी कोणाचा तरी स्वार्थीपणाने विचार करायचा हे सगळ लाइफस्टाइल हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सुरु आहे आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या लाइफस्टाइलमध्ये होत असतो. हे सांगण्याच तात्पर्य अस कि आपल्या लहानपणीच्या जगण्यात आणि आताच्या जगण्यात किती व्यापक अशी तफावत दिसून येते.
म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या हिताचा विचार करतो पण त्या बालपणाच्या निरागसतेचा कोणी एका क्षणासाठी सुद्धा विचार करत नाही. ह्या चिमुकलीची किलबिल सुद्धा कोणी तयार नसत. ती मात्र हरवलेल्या बालपणाचा शोध घेण्यातच गुंतून गेलेली असते.
त्या चिमुकलीचे ते अबोल भाव काळजाला जेव्हा स्पर्शून जातात आणि ते हरवलेले बालपण आपणही क्षणार्धात शोधू लागतो., कुठेतरी आपण आपल्या बालपणाचा विचार करू लागतो., आपल्याला आपल्या बालपणाची हुरहूर लागते ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतात केव्हा घडतात …………. ? तर जेव्हा आपल्याला हवीहवीशी वाटणारी माणस आपल्या सानिध्यात राहतात , आपल्याला समजून घेतात,
ण काहीही झाल तरी हरवलेलं बालपण शोधण्यात सुद्धा एक वेगळीच मज असते. आपल्या जीवनात एक प्रकारे नवलाईचं वातावरण निर्माण होतं. जरी आपण आपल हरवलेलं बालपण शोधत असलो तरीही आपल्याला नवीन आठवणींची साठवण करता येते, अनोळखी व्यक्तींसोबत एक नाव नात निर्माण होतं, बरेचशे चागले-वाईट अनुभव घेत येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी तरी स्पेशल असतो किंवा नसतोही पण आपल्याला आपल्या धेय्यापुर्तीकडे नेण्याचं काम माऊली करत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या हरवलेल्या बालपणाची आठवण करून देत असते आणि जगण्यातली ती चिमुकली सतत त्या गोष्टींचा शोध घेण्यातच मग्न असते ते या माउलीचं काळीज जपण्यासाठी……… !
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४
कॉपी पेस्टचा नवा ट्रेंड ………… !
अलीकडेच यंग जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी पेस्टचं फॅड निर्माण झाल आहे. स्वातंत्रपूर्व काळात कॉपी करण्यासठी मनात भय आणि धाडस या दोनही गोष्टीनी विचाराचं चक्र सुरूं व्हायचं तेव्हाच्या कॉपी पेस्ट मध्ये आणि आताच्या कॉपी पेस्ट मध्ये बराच फेरबदल झालेला दिसून येतो पूर्वी मनात भय असायचं आपली कॉपी पकडली गेली तर आणि कही येत नाहीय म्हणून कॉपी करण्यासाठी मनाची तयारी तर पाहिजेच त्यामुळे पूर्वी कॉपी करण्याच भय जास्त आणि धाडस कमी अशी परिस्थिती निर्माण व्हायची. तेव्हा कॉपी करणं म्हणजे काहीतरी अपराध किंवा खूप मोठी चूक केली आहे अस वाटायचं आणि तेव्हा मात्र वेताच्या छडीने मार खाणं म्हणजे नेमक काय ही संकल्पना चांगलीच समज देऊन जात असे.
हे सांगण्याचा उद्देश असा कि २१ व्या शतकात म्हणजेच जागतिकीकरणाच्या कालखंडात माध्यमांनी व्यापक प्रमाणात प्रगती केली आहे. आणि या प्रगतीचा परिणाम एकंदरीतच जनमत , मानसिकता , मानवी स्वारस्य , समाजकारण , राजकारण , अर्थकारण , संस्कृती , आधुनिकीकरण , फॅशान , अशा अनेक गोष्टींवर दर्शवत आहे.
आता कॉपी पेस्ट च्या माध्यमाने भय आणि धाडस या संकल्पना मोडकळीस आणल्या आहेत. तरुण वर्गामध्ये तर दिवसेंदिवस कॉपी पेस्टचं प्रमाण वाढते आहे. आणि तितक्याच झपाट्याने प्रगतीही होत आहे. पूर्वी कॉपी पेस्ट म्हटलं कि आपल्याजवळ चीट बाळगायची नाहीतर ह्याला त्याला विचारायचं इतकच माहित होतं पण आता कॉपी पेस्टमध्येसुद्धा वेगवेगळया पद्धती आल्या आहेत. उदाहरणार्थ : - इंटरनेटच्या माध्यमातून कॉपी पेस्ट ही पद्धत सोप्या रीतीने हाताळता येऊ लागली कॉपी म्हणजे केवळ चीट बाळगण हा प्रकार मर्यादित न राहता अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून हाताळण सोपं झालं.
थोडक्यात आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार आपण हव्या त्या गोष्टी सहज सर्च मारून कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ : - फोटो , व्हिडीओ , एखादी माहिती इत्यादी ……
हल्लीची परिस्थिती अशी झाली आहे कि कॉपी पेस्ट शिवाय कोणताही काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मानवाच्या गरजा वाढू लागल्या आहेत. आणि विचार करण्याची शक्तीचा यामुळे पूर्णतः अस्त झाला आहे.
पण हल्लीच्या धकाधकीच्या जगण्याचा विचार केला असता कॉपी पेस्टच्या या नव्या ट्रेंडमुळे माणसाचं जगणं कुठेतरी सोपं झाले आहे. अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे कॉपी पेस्टची संकल्पना व्यापक स्वरुपात विस्तारली आहे. कारण कॉपी पेस्ट हि संकल्पना केवळ परीक्षा स्वरूपातच अस्तित्वात न राहता माध्यमांद्वारे त्याचे स्वरूप बदलले . थोडक्यात सांगायचे तर माध्यमांनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याचे संशोधन करून कॉपी पेस्टची विशिष्ट स्वरुपात मांडणी करून त्याचे स्वरूप निदर्शनास आणले . कॉपी पेस्टमुळे माध्यमांचा दर्जा वाढू लागला , त्याचबरोबर मानवालाही प्रसिद्धी मिळू लागली.
पण तरीही मानव आणि यंत्र यांच्यामध्ये जास्त अधिक प्रमाणात तफावत असते. उदा . ते यंत्र तयार करण्याच काम मानव करतो आणि मानवाच्या तल्लख बुद्धीच्या वापराने ते यंत्र काम करू लागते . पण तरी सुद्धा मानव त्या यंत्राचा त्या माध्यमाचा गुलाम बनतो. पण मानवाच्या स्वार्थी आणि हव्यासक वृत्तीमुळे स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतो. आणि स्वतःच्या गरजेचा , सोयींचा विचार करून आपण आपला दर्जा वाढवण्याकरता सतत प्रयत्नशील असतो परंतु ते माध्यम हाताळण्याच गांभीर्य विसरतो , सामाजिक जाणीव विसरतो .
साधारणतः तसं पाहायला गेलं तर आपल्या हे लक्षात येईल कि जेव्हा आपण आपल्या जगण्यातल्या बर्याच गोष्टी समाजाशी जोडून घेत असतो रिलेत करत असतो तेव्हा ती गोष सामाजिक जाणीव , त्या गोष्टींच गांभीर्य , जबाबदारी या घटकांनी चहू बाजूंनी वेधून टाकलेलं असतं त्यामुळे मी अस म्हणते कि ज्याप्रमाणे आपण समाजाच्या चौकटीत जगात असताना वावरताना प्रत्येक प्रसंगानव्ये आपल्या हिताचा , आपल्या मानमर्यादेचा , सुरक्षेचा विचार करतो त्याचप्रमाणे आपण तितक्याच जोखमीने प्रसार माध्यमांचा सुद्धा विचार करायला हवा .
अर्थातच सध्य परिस्थितीचा एकंदरीत विचार करता आपण समजू शकतो कि मुळातच मध्यम हि एक व्यापक संकल्पना आहे. आणि काळाची गरज हा एक मानवी स्वारस्याचा भाग तर झाला आहेच पण त्याचबरोबर माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. आणि ह्या माध्यम बदलांच्या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे घटकांमुळे आज कॉपी पेस्ट चा नवा ट्रेंड प्रगतीकडे झपाट्याने झेप घेत आहे.
आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता कॉपी पेस्टमुळे जरी साध्य करता आल्या तरी या सगळ्या घटकांचा अभ्यास करून संशोधनाद्वारे या घटकांचे क्षेत्र विस्तारते. त्याचप्रमाणे मानवी स्वरास्यामुळे त्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते.
साधारणतः तसं पाहायला गेलं तर आपल्या हे लक्षात येईल कि जेव्हा आपण आपल्या जगण्यातल्या बर्याच गोष्टी समाजाशी जोडून घेत असतो रिलेत करत असतो तेव्हा ती गोष सामाजिक जाणीव , त्या गोष्टींच गांभीर्य , जबाबदारी या घटकांनी चहू बाजूंनी वेधून टाकलेलं असतं त्यामुळे मी अस म्हणते कि ज्याप्रमाणे आपण समाजाच्या चौकटीत जगात असताना वावरताना प्रत्येक प्रसंगानव्ये आपल्या हिताचा , आपल्या मानमर्यादेचा , सुरक्षेचा विचार करतो त्याचप्रमाणे आपण तितक्याच जोखमीने प्रसार माध्यमांचा सुद्धा विचार करायला हवा .
अर्थातच सध्य परिस्थितीचा एकंदरीत विचार करता आपण समजू शकतो कि मुळातच मध्यम हि एक व्यापक संकल्पना आहे. आणि काळाची गरज हा एक मानवी स्वारस्याचा भाग तर झाला आहेच पण त्याचबरोबर माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. आणि ह्या माध्यम बदलांच्या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे घटकांमुळे आज कॉपी पेस्ट चा नवा ट्रेंड प्रगतीकडे झपाट्याने झेप घेत आहे.
आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता कॉपी पेस्टमुळे जरी साध्य करता आल्या तरी या सगळ्या घटकांचा अभ्यास करून संशोधनाद्वारे या घटकांचे क्षेत्र विस्तारते. त्याचप्रमाणे मानवी स्वरास्यामुळे त्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते.
बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४
माझं स्टेटस हीच माझी ओळख ……………!
हल्ली स्वतःची एक नाविण्यपूर्ण ओळख बनवण्यासाठी स्टेटसचा चांगलाच ट्रेंड आला आहे. आणि ही ओळख प्रसारमाध्यमांमुळे निर्माण झाली आहे. आनंद , दुःख , साठवणी , भावना या सगळ्या गोष्टी आपल्या स्टेटसमध्ये सामावून जातात. आणि त्या आपण माध्यमांद्वारे व्यक्त करत असतो. आपल्याला त्या व्यक्त करायच्या नसतात पण त्या माध्यामप्रभावी व्यक्त होत जातात.
उदाहरणार्थ :- whatsup आपण या संवादाच्या माध्यमातून केवळ चर्चाच करत नाही तर आपण आपली ओळख दाखवण्याकरता , निर्माण करण्याकरता छान फोटो अर्थात whatsup dp म्हणून ठेवतो. , त्याचप्रमाणे प्रत्येक बदलत्या वेळेनुसार , दिवसानुसार , वातावरणानुसार , आणि आपल्या उत्साहानुसार-मानसिकतेनुसार आपण आपले स्टेटस ठेवत असतो आणि सतत बदलत असतो त्यालाच एक प्रकारे माध्यमांद्वारे व्यक्त होणे अस म्हणतात.
खर तर एक स्मायली सिम्बॉल सुद्धा आपल्या भावनांना मोकळीक देत असते. तसं म्हणायचं झाल तर हल्ली नात्यातला गोडवा सुद्धा माध्यमातून व्यक्त करता येऊ लागला आहे. उदाहरणार्थ :- मामा , काका , दादा , ताई कोणीही नातेवाईक असोत कोणाचा वाढदिवस असो, व कोणाच्या प्रमोशनची बातमी असोत पार्टी स्टेटस सुद्धा झळकावणं शक्य झालंय. हे नातं भावतं कि नाही हे तर माहीत नाही पण कुठेतरी एक जिव्हाळा व्यक्त करता येतो हे मात्र खर …… !
स्वतःची ओळख निर्माण करणारं स्टेटस आपल्याला आपल्या ओळखीपर्यंतच मर्यादित ठेवत नाही तर आपल्या मानसिकतेमध्ये आपल्या विचारांमध्ये सुद्धा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो थोडक्यात आपल्यामध्ये आपसूकच एक प्रकारचा इगो , अतिआत्मविश्वास निर्माण होत जातो. आणि आपल्या वागण्या - बोलण्यात सुद्धा अधिक प्रमाणात फेरबदल झालेला दिसतो, हा आपल्यामध्ये झालेला बदल बरेचदा स्वतःला दिसून येत नाही पण आपले आई-बाबा , शेजारी वा मित्र-मैत्रीणीना दिसून येतात. आपल्या राहणीमानाला एक वेगळा लूक येतो. आपल्या भाषेत , आपल्या खानपानात बदल, वेशभूषा , केशभूषा , असे अनेक बदल आपल्यामध्ये घडून येताना दिसतात. उदाहरणार्थ : - आपल्या बोलीभाषेला glamarar शब्दांच स्वरूप प्राप्त झालं आहे. थोडक्यात hiiiiiii - hello , wts up . त्याचप्रमाणे खानपानाच्या पद्धतीत बदल झाले थोडक्यात स्वतंत्रपूर्व काळापासून भारतामध्ये वरण-भात , भाजी-पोळी असे मोजकेच आणि मर्यादित खाद्यपदार्थ माहित होते पण आता २१ व्या शतकात तस राहिलेलं नाही. प्रसारमाध्यमांमुळे अनेक खाद्यपदार्थांना सुद्धा ओळख निर्माण झाली. नवनवीन पदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर, चायनीज अशा फास्ट फूड , जंक फूड अशा खाद्यपदार्थांची ओळख निर्माण झाली आणि ती ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता त्या पदार्थांना प्रसिद्धीबरोबरच लोकांच्या राहणीमानास अनुसरून एक नवं लाइफस्टाईल प्राप्त झाल आहे त्यामुळे मानवी स्वारस्याला चालना मिळत आहे.
तसेच पेयांमध्ये सुद्धा जूस, कोल्ड्रिंक्स त्यामध्ये पण कोक , पेप्सी , सोडा , मिरिंडा अशे बरेच प्रकार असतात त्यातही विविध प्रकारचे रंग , फ्लेवर असतात आणि हल्लीच्या तरुण पिढीसाठी ह्या पेयांच सुद्धा नवीनच फॅड आल आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं या कोल्ड्रिंक्सवरुनसुद्धा आपले स्टेटस ठरतात. आणि त्या बदलत्या स्टेटसनुसार आपली मानसिकताही तेवढ्याच जलद गतीने बदलत जाते ती बदलण्यास माध्यमं प्रोत्साहन देत असतात.
साधारणतः सध्या त्यामानाने पूर्वी आपल्या भावना मनाच्या हळव्या कप्प्यातच व्यक्त कराव्या लागायच्या पण आता प्रसारमाध्यमांमुळे मानवाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पूर्वी तर आणि पत्र पाठवण्यापलीकडे दुसरा माहितीचा काहीच सोर्स नव्हता. पण आता तसं राहिलेलं नाही १९९१ मध्ये जागतिकीकरणाचा उदय झाल्यामुळे अनेक सोयी उपलब्ध झाल्या माध्यम तंत्रज्ञानाला चालना मिळाली , समाजामध्ये मानवी स्वारस्य निर्माण झालं आणि नवनवीन गोष्टींचं फॅड निर्माण होऊ लागलं. माध्यमांद्वारे व्यक्त होता येऊ लागलं. , मोकळीक मिळू लागली , विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली , आणि मानवी स्वारस्यानुरूप स्टेटस ची ओळख निर्माण झाली.
त्याचप्रमाणे comment , प्रतिक्रिया , सिम्बॉल , मेसेंजर सारख्या अनेक सोर्समुळे आपल्या स्टेटसला एक नाविन्यपूर्ण रचना प्राप्त झाली. या सोर्सद्वारे आपल्याला आपली मत व्यक्त करता येऊ लागली , आपल्यामध्ये मतपरिवर्तन होऊ लागलं त्या त्या स्टेटसनुसार त्या त्या वातावरणानुसार आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावं हे स्टेटसच्या फॅडमुळेच लक्षात येऊ लागलं. तेहापासून फॅशनचं नवं युग सुरु झालं.
तसं पाहायला गेलं तर माध्यमांमुळे सध्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा आलेल्या नसल्या तरीही नाती जपण्याला आणि जवळीक साधण्याला मात्र नक्कीच आर्यादा आलेल्या आहेत. कारण स्टेटसने आपण आपली ओळख निर्माण करू शकतो , मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो पण तरीही माध्यमांनी जपलेला जिव्हाळा आणि जगण्यातला जिव्हाळा जपण्यात मात्र खूप फरक असतो. थोडक्यात जवळच्या नात्यांपुढे दुरावा असणारी नाती हे केवळ माध्यमांसारखीच आपण चालवू तशीच चालतात. स्टेटसचं हे फॅड केवळ एक मनोरंजनच साधन आहे. तेवढ्यापुरता सुगावा , समाधान देण्याचं काम स्टेटस करत असंत.
तसेच पेयांमध्ये सुद्धा जूस, कोल्ड्रिंक्स त्यामध्ये पण कोक , पेप्सी , सोडा , मिरिंडा अशे बरेच प्रकार असतात त्यातही विविध प्रकारचे रंग , फ्लेवर असतात आणि हल्लीच्या तरुण पिढीसाठी ह्या पेयांच सुद्धा नवीनच फॅड आल आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं या कोल्ड्रिंक्सवरुनसुद्धा आपले स्टेटस ठरतात. आणि त्या बदलत्या स्टेटसनुसार आपली मानसिकताही तेवढ्याच जलद गतीने बदलत जाते ती बदलण्यास माध्यमं प्रोत्साहन देत असतात.
साधारणतः सध्या त्यामानाने पूर्वी आपल्या भावना मनाच्या हळव्या कप्प्यातच व्यक्त कराव्या लागायच्या पण आता प्रसारमाध्यमांमुळे मानवाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पूर्वी तर आणि पत्र पाठवण्यापलीकडे दुसरा माहितीचा काहीच सोर्स नव्हता. पण आता तसं राहिलेलं नाही १९९१ मध्ये जागतिकीकरणाचा उदय झाल्यामुळे अनेक सोयी उपलब्ध झाल्या माध्यम तंत्रज्ञानाला चालना मिळाली , समाजामध्ये मानवी स्वारस्य निर्माण झालं आणि नवनवीन गोष्टींचं फॅड निर्माण होऊ लागलं. माध्यमांद्वारे व्यक्त होता येऊ लागलं. , मोकळीक मिळू लागली , विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली , आणि मानवी स्वारस्यानुरूप स्टेटस ची ओळख निर्माण झाली.
त्याचप्रमाणे comment , प्रतिक्रिया , सिम्बॉल , मेसेंजर सारख्या अनेक सोर्समुळे आपल्या स्टेटसला एक नाविन्यपूर्ण रचना प्राप्त झाली. या सोर्सद्वारे आपल्याला आपली मत व्यक्त करता येऊ लागली , आपल्यामध्ये मतपरिवर्तन होऊ लागलं त्या त्या स्टेटसनुसार त्या त्या वातावरणानुसार आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावं हे स्टेटसच्या फॅडमुळेच लक्षात येऊ लागलं. तेहापासून फॅशनचं नवं युग सुरु झालं.
तसं पाहायला गेलं तर माध्यमांमुळे सध्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा आलेल्या नसल्या तरीही नाती जपण्याला आणि जवळीक साधण्याला मात्र नक्कीच आर्यादा आलेल्या आहेत. कारण स्टेटसने आपण आपली ओळख निर्माण करू शकतो , मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो पण तरीही माध्यमांनी जपलेला जिव्हाळा आणि जगण्यातला जिव्हाळा जपण्यात मात्र खूप फरक असतो. थोडक्यात जवळच्या नात्यांपुढे दुरावा असणारी नाती हे केवळ माध्यमांसारखीच आपण चालवू तशीच चालतात. स्टेटसचं हे फॅड केवळ एक मनोरंजनच साधन आहे. तेवढ्यापुरता सुगावा , समाधान देण्याचं काम स्टेटस करत असंत.
या जगण्यातून आपल्याला स्टेटस ठेवण्यासाठी अनेक विषय सुचत जातात , मिळत जातात आणि त्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण होते.
शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४
अनुभव घेण्यासाठी इंटर्नशीपचा नवा क्रेझ………!
पंधरावी पर्यंत शिक्षण घेताना प्रत्येकजण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मात्र त्या गाठलेल धेय्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी माणूस आपल्या जगण्याचे आपल्या आयुष्याचे दोन टप्पे सतत अभ्यासत असतो , आणि चांगले वाईट क्षण अनुभवत असतो. ते म्हणजे पंधरावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा पहिला टप्पा असतो आपल्याला आपल्या जबाबदा-यांची जाणीव होणं आणि दुसरा टप्पा असतो नोकरीचा शोध घेण………………?
अलीकडेच सध्या मोफत काम शिकण्याचा इंटर्नशीपचा नवा क्रेझ आला आहे. थोडक्यात सांगण्याच तात्पर्य असं कि पूर्वी असं काही नव्हतं पूर्वी उत्तीर्ण पदव्यांना प्रथम प्राधान्य देऊन थेट नोकरीसाठी त्या त्या व्यक्तीची निवड केली जायची परंतु आता काळानुसार एकंदरीत सगळ्याच पद्धतींमध्ये बदल घडून आले आहेत. शैक्षणिक स्पर्धा वाढू लागल्या आहेत. माध्यम पद्धतींमध्ये बदल घडून येत आहेत. माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांमध्ये मानवी स्वारस्य निर्माण होऊ लागले आहे. लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडू लागले आहेत. शिक्षणपद्धातीचे स्वरूप बदलत चालले आहे. आणि बदलत्या शिक्षणपद्धतीचा इंटर्नशीपवर व्यापक प्रमाणात प्रभाव पडू लागला आहे.
कारण सध्या नोकरी क्षेत्रात माध्यम तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढू लागल्या आहेत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे पूर्वी त्यांच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना प्रथम प्राधान्य दिल जायचं पण हल्ली तुमच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना तितकासं प्राधान्य दिलं जात नाही. तर तुमच्या प्रायोगिक ज्ञानाला , तुमच्यातल्या आत्मविश्वासाला , कृतीला , क्रिएटिव्हीला , तुम्ही सतत अपडेट राहण्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि त्याकरता अनुभव घेण्यासाठी माध्यमांनी इंटर्नशीपचा नवा क्रेझ निर्माण केला आहे. कि तुमच्या शिक्षणासोबत तुमच्यातलं ज्ञान हे केवळ थिअरी पुरतंच मर्यादित न राहता ते आपल्या कृतीतून दिसावं आणि आपण सतत अपडेट राहावं.
इंटर्नशीप करण्याची ही पद्धती एक प्रकारे मोफत काम शिकण्याची आणि त्याहून अधिक जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची आपलं धेय्य सार्थकी लावण्याची पहिली पायरी आहे. एकंदरीतच इंटर्नशीप करताना आपल्याला ब-याच गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ :- पुस्तकांचे संदर्भ , लेखनाची एक विशिष्ट शैली , भाषा , मानवी स्वारस्य , जनमत आणि लोकांची मानसिकता , वर्तमानपत्रांची माहिती थोडक्यात लेआऊट , डिझाईन , विपणन , वितरण , जाहिराती आणि वृत्तसंस्थांच महत्व , मूल्यमापन , बातमीचं अथवा त्या त्या विषयाचं गांभीर्य तसेच वर्तमानपत्राच्या पानाच आणि चौकोनातल्या बातमीच महत्त्व, लेख , अग्रलेख , संपादकीय पान , छायाचित्र , फिचर अशा खूप स-या गोष्टी इंटर्नशीपमध्ये प्रत्यक्ष काम करताना अनुभवायला मिळतात. अनेत गोष्टी जाणून घेत येतात. अनेक विषय चर्चेस येतात , समजू लागतात. विचारांची देवाण-घेवाण होते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपले मत मांडण्याला मत परिवर्तन करण्याला वाव मिळतो. प्रत्येकाला मोकळे पणाने जगता यावं याकरता माध्यम शास्त्राने तरुणाईला इंटर्नशीप नामक स्त्रोताचा नवा मार्ग खुला करून दिला आहे.
जेणेकरून आताच्या तरुणाईला लोकांपर्यंत त्यांच्या विचारापर्यंत आणि त्यांच्या मतांपर्यंत पोहोचता येईल तसेच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही साधारणतः ६ महिने मोफत काम शिकून आपल्याला त्या कामाच्या मोबदल्यात काम केल्याच प्रमाणपत्र मिळते आणि जर आपण त्याच ठिकाणी नोकरी करण्यास इच्छुक असल्यास आपण नोकरी करू शकतो.
इंटर्नशिप करतानाचे आपले अनुभव खूपच निराळे असतात. उदाहरणार्थ :- पत्रकारितेत काम करत असताना शिक्षक आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगत असतात कि तू पत्रकार म्हणून समाजात वावरताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती असण फार आवश्यक आहे आही हल्ली माध्यमच इतकी प्रगत झाली आहेत कि वाचन करणं हि संकाल्पनाच कुठेतरी नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वाचनांच प्रमाण खूप कमी होत चालल आहे असं दिसून येतंय. अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या आयुष्यातून वगळून टाकलेल्या असतात त्या आपल्याला या इंटर्नशीपच्या माध्यमातून उमगू लागतात.
त्याचप्रमाणे एकत्र काम करतानाची एक वेगळीच मज्जा सर्वांसोबत अनुभवायला मिळते. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत , एक वेगळी स्पेशालिटी जाणून घ्यायला मिळते. एकत्र काम करण्याबरोबरच वास्तवात एक नाविण्यपूर्ण आनंद लुटला येतात. एकत्रितपणे काम करून काम करण्याची नाविण्यपूर्ण इच्छाशक्ती प्राप्त होते. स्वतःला घडवण्याची उर्जा सतत काही न काही कौशल्य दर्शवत असते. आणि आपल्यातल्या केलेला एक वेगळी ओळख निर्माण करून देते आणि मानाचं स्थान मिळवून देणारं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष काम करताना घडत जाते.
इंटर्नशीप करताना आपला मानसिक , बौद्धिक , सामाजिक , आर्थिक , राजकीय , सांस्कृतिक असे विविध टप्पे आपल्याला समजत जातात आणि विकसित माध्यमांसोबत इंटर्नशीपला सुद्धा विद्यार्थ्यांचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला आणि एक प्रकारचं विकसित स्वरूप प्राप्त झालं.
शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४
आयव्ही नावाची सहल…………………………. !
खरं तर आयव्ही म्हणजे काय हेच माहित नसे. आयव्ही या शब्दाची ओळख मात्र तेरावीला असताना झाली. मला तर अगदी बारावीपर्यंत सहल इतकच माहित होतं. आणि सहल म्हणजे मज्जा करणं इतकीच मानसिकता तयार झालेली असायची. पण म्हणतात नं कि आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले विचार बदलत जातात आणि आपल्या करीयरची सुरुवात ज्ञानापासून होत असते आणि त्या ज्ञानाच गांभीर्य आपल्याला समजते.
हि आयव्ही नावाची सहल आपल्याला कळत नकळत बरेच काही अनुभव देऊन जातात आणि तेच क्षण मी अनुभवले आहेत. आयव्हीला जायचं म्हणजे ग्रूपशिवाय मज्जाच नाही. धमाल , मस्ती , चर्चा , सेटिंग या सगळ्याच गोष्टींसाठी ग्रुप हा हवा असतोच त्याशिवाय आयव्ही तरी परिपूर्ण कशी होऊ शकेल ? असोत पण आयव्ही नामक सहल ही केवळ मज्जा नाही तर हे एक अभ्यासाचं माध्यम आहे. सुरुवातीला मलासुद्धा हे समजल्यावर आश्चर्य वाटलं होतं पण खरच कधी कल्पनाच केली न्हवती कि आयव्ही हे एक इतक प्रभावशाली माध्यम असेल म्हणून.
म्हणजे आता बघा न मी १४ वी ला असताना आमची आयव्ही केरळला गेली होती. निसर्गाचा तेजोमयपणा , त्या निसर्गाचं सौंदर्य , आणि पर्यावरणाची काळजी घेणारी तेथील माणसं गेली कित्येक वर्ष यांनी तो जिव्हाळा जपला आहे, त्या निसर्गाच्या भावना जाणल्या आहेत. आणि केरळच मुख्य वैशिष्ट्य हे आहे कि तेथील सरकारला सुद्धा आपल्या राज्याची आणि मुख्यत्वे पर्यावरणाची पुरेपूर जाणीव आहे. या निसर्गसौंदर्याने केरळची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अभिमान वाटतो कि तेथील सरकार आपल्या जबाबदा-या लक्षपूर्वक पार पाडते आणि खंत एकाच गोष्टीची वाटते की भारतात तर गेली कित्येक वर्ष पर्यावरणाच भान हरपलंय पर्यावरणाची उणीवही कोणाला भासत नाही आणि प्रदूषण अथवा आरोग्यासंदर्भात कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तरीही सरकार शांतच………? हे किती घृणास्पद आहे म्हणजे थोडीही लाज नसावी…………?
हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे कि हल्लीच्या तरुणाईला या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो आणि जेव्हा आयव्ही सारख्या माध्यामातून आपल्याला अशा गोष्टींची माहिती मिळत जाते तसतशी आपल्या ज्ञानात वाढ होत जाते आपल्याला जबाबदा-यांची जाणीव होते आणि आपण अनेक विषयांवर चर्चा करू लागतो , विचार करू लागतो, त्या त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळू लागतं.
साधारणतः आपण जेव्हा आयव्हीला फिरायला जातो तेव्हा त्या कालावधीत आपल्यामध्ये एक जाणतं आणि आपुलकीचं नातं काळत नकळत कधी निर्माण होत जात हे आपल आपल्यालाच ठाऊक नसतं. आणि एखाद्या ठिकाणी फिरताना आपल्याला त्या ठिकाणची संस्कृती , भाषा , खाद्यपदार्थ , त्यांची समाजात वावरण्याची एक पद्धती , तेथील ऎतिहासिक बांधकामाची माहिती मग त्यातही त्या शेकडो वर्षापूर्वीच्या बांधकामासाठी वापरलेले शिल्पं आणि शिल्पकार , त्या कालावधीत झालेली युद्ध अशी खूप सारी माहिती आपल्याला या आयव्ही नामक माध्यमातून जाणून घेता येते.
उदाहरणार्थ :- केरळमध्ये धार्मिक संकृतीचा तेथील लोकांवर व्यापक प्रमाणात प्रभाव आहे. तसेच केरळमध्ये संकृतीला पाहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि निसर्गावर प्रेम करणं हे तेथील लोकांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
ही माहिती मला आयव्हीच्या माध्यमातून मिळाली. आणि तेव्हा अभ्यास करण्याचं नवं माध्यम मला मिळालं येथपासून अनुभवांची शिदोरी माझ्या हाती लागली. प्रगतशील माध्यमातून प्रगतशील विचारांची देवाणघेवाण सुरु झाली. अगदी कुठेही फिरायला गेल्यानंतर तो विषय कधी त्या मनाच्या हळव्या कप्प्यात दडून जातो हे माझं मलाच कळत नसे.
साठवणीच्या गाभा-यात आयव्ही हा विषय अगदीच जिव्हाळ्याचा विषय झाल्यापासून कुठेतरी असं जाणवू लागलं कि जगणं हे कधीच भावनांपर्यंत थांबत नसतं त्या भावना व्यक्त कारणासाठी या सहलीतून मला मोकळीक मिळत गेली. क्षणोक्षणी काही ना काही अनुभवणारं , भासवणारं , काळजाला स्पर्शून जाणारं , व्यक्त होणारं , भावणारं असं जगण्यातलं जगणं मला केवळ आठवणीनेच जपता आलं
फिरण्यातंन तर भरपूर आठवणी जपता आल्या , आणि आनंदाने व्यक्तही होता आलं पण खरी मज्जा तर ग्रुपमध्ये होती. ग्रुपमध्ये चर्चा करताना गॉसीप नावाचं माध्यम लागायचं ते गॉसिप अगदी ट्रेनमधील प्रवासापासून सुरु झालेलं असायचं आणि तरुणाईच्या चर्चा म्हणजे भाषेच्या प्रभावापासून परिणाम दर्शवण्यास सुरुवात व्हायची त्या तरुणाईच्या प्रभावी भाषेमध्ये शिक्षकांचाही सहभाग असायचा आणि या प्रवासात एकंदरीतच भाषेच्या माध्यमापासून होणारी सुरुवात हळूहळू सगळ्या माध्यमांच्या खोलात शिरायची. म्हणजे संवाद , विचारांची देवाण-घेवाण , फोटोग्राफी , विविध पुस्तकांचे संदर्भ , कविता अथवा शेरोशायरीची मैफिल आणि त्यातून होणारे हस्यविनोद सुद्धा कळत नकळत काही ना काही संदेश पोहोचवत असे.
प्रत्येकजण स्वतःच्या कलेची ओळख करून देताना त्या कलेला माध्यमाच स्वरूप प्राप्त झालं मात्र ज्ञान आणि जगणं या दोन्ही गोष्टींना आयव्ही नामक सहलीच्या माध्यमातून वाव मिळत गेला. त्याचप्रमाणे तरुणाईला वेगवेगळे विषय मिळत गेले. आणि तरुणांमध्ये हळूहळू एक व्यापक दृष्टीकोण निर्माण होऊ लागला.
मुलाखत :- सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणे आवशयक आहे का ?
शेखर सोनाळकर :- छात्र युवा संघर्ष वाहिनी .
माझ्या जीवनातली नव्याने अनुभव घेणारी ही पहिलीच मुलाखत, मनात तर प्रचंड भय होतं पण करायचं काय मुलाखत तर घ्यावी लागणारच प्रश्नांपेक्षा मनात भीतीनेच घर करून ठेवल होतं पण विषय अगदीच सोपा आणि हलका आणि मला झेपेल इतका साजेसा होता. पण मनात तर अजून एक भीती होती की मुलाखत देणारे कलीग कसे असतील, ते मला चांगला प्रतिसाद देतील न?, आणि मी इतक्या मोठ्या व्यक्तीशी कस बोलणार आहे बापरे अगदीच घामाने डबडबून गेले होते., मी त्यांना योग्य प्रश्न विचारू शकेल ना? माझ अज्ञान तर त्यांना दिसणार नाही न? असं प्रश्नाचं चक्र बराच वेळ सुरु होतं पण मनाची तयारी तर करावी लागणार होतीच आणि यापलीकडे विचार करण्यासाठी तितकासा वेळ सुद्धा नव्हता, अलीकडे थोड्या वेळातच मुलाखत सुरु होणार होती मनात भीती तर होतीच पण आईने मात्र मला माझा गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिला होता. मुलाखत सुरु झाली, शेखर सोनाळकरजी आणि मी समोरासमोर बसलो आमची तोंडओळख झाली आणि आमच्या संवादाला सुरुवात झाली. मी त्यांना प्रश्न विचारला कि सर सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणे आवश्यक आहे का ?…………………… ते जे सुरु झाले कि मला त्यांना पुढचा प्रश विचारण्याची संधीच त्यांनी मला दिली नाही त्या एका प्रश्नातच त्यांनी ही मुलाखत परिपूर्ण केली. तर आपण या मुलाखतीमधून त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेणार आहोत त्या पुढीलप्रमाणे :-
ड्रेसकोडचा पहिला उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये फरक करता येऊ नये. दुसरा उद्देश श्रीमंत गरीब वर्गामध्ये फरक करता येऊ नये. , तिसरा उद्देश वेगवेगळ्या जाती धर्माची व्यक्ती वेगळी वेगळी ओळखता येऊ नये. , आणि चौथा उद्देश म्हणजे शिक्षकांची सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी समत्वाची असावी. कोण श्रीमंत आहे , कोण गरीब आहे , कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे , कोण हिंदू आहे , कोण मुसलमान आहे असे भेदभाव करता येऊ नयेत. त्यामुळे शिक्षकांची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी समत्वाची असावी.
महाविद्यालयांना ड्रेसकोड कंपल्सरी केल्याने सध्या होणार आहे का ? त्यांचा ड्रेस महाविद्यालय देणार आहे का ? की काळी पेन्ट आणि पंधरा शर्ट असं म्हटल्यानंतर अगदी ५० रुपयांपासून ते ५,००० पर्यंतचे पीस येतात त्याच्यातपण पांढरा शर्त अतिशय स्वस्तात्पासून कमालीच्या महागपर्यंत येतो आणि त्यात त्यात ड्रेसकडे पाहिल्यानंतर ते लक्षातही येते याचा दर्जा काय आहे ते……! जर का असं होणार असेल तर त्या ड्रेसकोडचा उद्देशच काय सफल होणार ?
ड्रेसकोडचा आणखी एक उद्देश म्हणजे नीती स्तलावणे. साधारणतः विद्यार्थ्यांना थोडं मोकळ सोडणं आवश्यक असतं , त्यांच लहानपण संपलेलं आहे आता त्यांना स्वयंशिस्त अंगात आण अशी आशा असावी. आता त्यांना शिस्त लावण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना स्वयंशिस्त आणि थोडी मोकळीक असावी म्हणून महाविद्यालयालयामध्ये अजून ड्रेसकोड आलेला नाही. ; आता जे लोक असं म्हणतात की ड्रेसकोड लावावा त्यांना नेमकं काय हवाय , म्हणजे नेमकं ड्रेसकोड मागचं शास्त्रीय कारण काय ? कशासाठी हवाय ड्रेसकोड ? आणि ड्रेसकोड हवा असेलच तर तो केवळ विद्यार्थ्यांनाच का ? शिक्षकांना का नको ; शिक्षकांना सुद्धा पाहिल्यानंतर टिकली
ड्रेसकोडचा आणखी एक उद्देश म्हणजे नीती स्तलावणे. साधारणतः विद्यार्थ्यांना थोडं मोकळ सोडणं आवश्यक असतं , त्यांच लहानपण संपलेलं आहे आता त्यांना स्वयंशिस्त अंगात आण अशी आशा असावी. आता त्यांना शिस्त लावण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना स्वयंशिस्त आणि थोडी मोकळीक असावी म्हणून महाविद्यालयालयामध्ये अजून ड्रेसकोड आलेला नाही. ; आता जे लोक असं म्हणतात की ड्रेसकोड लावावा त्यांना नेमकं काय हवाय , म्हणजे नेमकं ड्रेसकोड मागचं शास्त्रीय कारण काय ? कशासाठी हवाय ड्रेसकोड ? आणि ड्रेसकोड हवा असेलच तर तो केवळ विद्यार्थ्यांनाच का ? शिक्षकांना का नको ; शिक्षकांना सुद्धा पाहिल्यानंतर टिकली
लावणा-या , भांग पाडणा-या महिला पाहिल्यानंतर स्त्रिया हिंदू आहे हे लक्षात येतं मग शिक्षकांना सुद्धा कोण हिंदू - मुसलमान हे लक्षात यायला नको. विद्यार्थ्यांना सगळे शिक्षक सारखे असायला पाहिजेत. असं जर हवं असेल तर शिक्षकांना का ड्रेसकोड नको , प्राचार्यांना का नको ? आणि मग ड्रेसकोड यातनं काय साध्य होतं. विद्यार्थ्यांना काही मोकळीक मिळत नसेल मग ड्रेसकोचा हट्ट कशासाठी ? त्यामुळे ड्रेसकोड नसावा आणि ज्यांना ड्रेसकोड आणायचाच असेल त्यांनी यामागचं लॉजिक सांगावं.
जे अस म्हणतायत त्यांना ते मुलींवर बंधनं आणण्याकरता ड्रेसकोड ठेवायचा आहे मुलांकरता काही त्यांना ड्रेसकोड नकोय. म्हणजे आजच्या मुली जर अधिक मोकळे कपडे घालतात , अगदी स्पष्ट सांगायचं तर त्यांचे अवयव दिसतात जे दिसू नये असं जे संस्कृतिरक्षकांना वाटतंय त्यांना असं वाटतंय कि ड्रेसकोड असावा. तुम्ही ड्रेसकोड ठेवला तर मला सांगा तुम्ही पंजाबी ड्रेस आणि सलवार घालणं काय हो ? आणि जर आपण मुलींकरता ड्रेसकोड शर्ट pant ठेवला तर त्यातनं ज्याला बघायचं त्याला दिसतं , ज्याला दाखवायचं आहे त्याला दाखवता येतं म्हणजे ह्यातून संकृतीराक्षाकांचे हेतू साध्य होत नाहीत. आणि हे बंधनाच्या दृष्टीकोनातून जरा गंभीरच आहे. आणि मुळात तरुणवर्गाची मानसिकता बदलणार नाही…………!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)